712 : 50 पेक्षा कमी पैसेवारी, पण मदत नाही

Continues below advertisement
खरीप हंगामातील राज्यातील गावांची पैसेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये राज्यातील तब्बल 9 हजार गावांची पैसेवारी 50 पैशांपैक्षा कमी आली आहे. अशी परिस्थिती असूनही या गावातील शेतकरी सरकारी मदतीपासून वंचित राहणार आहेत. केंद्र सरकारचं सुधारित दुष्काळी मॅन्यूअलमधील जाचक निकष यामागे कारणीभूत आहे. या मॅन्यूअलमध्ये पैसेवारी संबंधीचे जुने निकष कालबाह्य ठरवण्यात आले आहेत. या निकषांमध्ये बदल करण्याची मागणी राज्य सरकार केंद्र सरकारला करणार आहे. याबाबतच्या मागण्यांचं पत्र राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram