712 : बारामती : वादळी पावसामुळे 555 एकरातील केळी, डाळिंब बागांचं नुकसान
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बारामती आणि इंदापूर तालुक्यात वादळी वारा आणि जोरदार पावसामुळे मोठं नुकसान झालं. कृषी आणि महसुल विभागाने याचा अहवाल जिल्हाअधिकाऱ्यांना पाठवला. या अहवालानुसार या दोन तालुक्यात तब्बल ५५५ एकरावरील फळबागांचे नुकसान झाले आहे.. बारामती आणि इंदापूर या तालुक्यात ३३ गावात मोठयाप्रमणावर नुकसान झालेय..बारामती तालुक्यात १०५ एकर वरील डाळिंबाचे आणि ७० एकरावरील केळींचे नुकसान झाले. इंदापुर तालुक्यात ३० एकर डाळिंब बागेचे व ३५० एकर केळींच्या बागेचे नुकसान झाले आहे.. सध्याचा अहवाल हा प्राथमिक स्वरुपाचा आहे.