Godavari River Pollution | गोदावरीला जलपर्णीचा वेढा, पाण्यावर फेस, पर्यावरणमंत्री लक्ष घालणार का?
एबीपी माझा वेब टीम | 13 Jan 2021 02:30 AM (IST)

महाराष्ट्रात नदी प्रदूषणांचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत असतानाच नाशिकच्या गोदावरी नदीचा पानवेलींमुळे श्वास कोंडला गेलाय, प्रशासनाच्या अनास्थेमुळे ही परिस्थिती ओढावल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींकडून केला जात असून सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देणार का ? महाराष्ट्रातील नद्या मोकळा श्वास कधी घेणार ? हा प्रश्न आता उपस्थित होतोय.