State Farmer Special Report :हरभरा खरेदीसाठीही तारीख पे तारीख, राज्यात शेतकऱ्यांची थट्टा कधी थांबणार
abp majha web team
Updated at:
27 Feb 2023 09:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नाशिकमध्ये कांद्या उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत. कांद्याला भाव मिळत नसल्याने लासलगाव बाजार समिती मधील कांदा लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडलेत. त्यामुळे येत्या दिवसात विधिमंडळ अधिवेशनात कांद्याचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे पुरंदरमध्ये ९५ किलो वांग्याच्या विक्रीतून अवघे ६६ रुपये मिळाल्याने शेतकऱ्याने पिकावर कुऱ्हाड चालवलीये. तर अमरावतीत नाफेड केंद्रावर चणा खरेदी नोंदणीच बंद पडलीये. त्यामुळे शेतकऱ्यांना चणा विक्रीसाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणारेय. एकुणच काय तर राज्यातल्या शेतकऱ्याच्या मागच्या चिंता काही केल्या कमी होत नाहीयेत.