Satara Corona : पश्चिम महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढ का होतेय? साताऱ्यात कोरोना रुग्णवाढीचा विक्रम
राहुल तपासे, एबीपी माझा
Updated at:
07 Aug 2021 12:04 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात काल कोरोनामुळे 120 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.1 टक्के झाला आहे. तब्बल 34 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 74 हजार 995 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एकूण सहा जिल्ह्यांमध्ये अॅक्टिव्ह रुग्ण 100 च्या खाली आहेत. नंदूरबार (10), हिंगोली (76), अमरावती (87), वाशिम (94), गोंदिया (95), गडचिरोली (31) या सात जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 14, 974अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.