Special Report | साखळी बॉम्बस्फोटांना 28 वर्षे पूर्ण; मुंबईसाठी धावूनही राजेंद्र जाधव यांची उपेक्षा
निलेश झालटे, एबीपी माझा | 12 Mar 2021 06:58 PM (IST)

कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या इशाऱ्यावर मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांना 28 वर्षे झाली. या साखळी बॉम्बस्फोटात 257 नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर चौदाशेहून अधिक नागरीक गंभीररित्या जखमी झाले होते. त्यामुळं मुंबईत भितीचं आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्या वातावरणात निवृत्त मेजर वसंत जाधव आणि त्यांच्या बॉम्बशोधक पथकानं आपल्या जीवावर उदार होऊन हॅण्डग्रेनेड आणि आरडीएक्स बॉम्ब निकामी करण्याची जबाबदारी चोख बजावली. म्हणूनच मुंबईचं आणखी नुकसान टळलं. पण मेजर जाधव यांच्या या कामाचं कौतुक अजूनही कौतुक झालेलं नाही. पाहूयात आमचा प्रतिनिधी निलेश बुधावलेचा रिपोर्ट.