निसर्ग चक्रीवादळाला एक वर्ष पूर्ण, वर्ष उलटूनही वादळाच्या जखमा कायम, घरं, संसार, सारंकाही उध्वस्त
अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी | 04 Jun 2021 09:27 PM (IST)

निसर्ग चक्रीवादळाच्या खुणा अद्याप देखील कोकणवासियांच्या मनावर कायम आहेत. निसर्गानं दिलेलं निसर्ग चक्रीवादळानं सारं नेलं. घरं, बागा, संसार सारं काही उद्धवस्त झालं. सरकारकडून मदत मिळाली. पण, या चक्रीवादळानंतर कोकणवासियांचं आयुष्यच बदलून गेलं. वर्षभरानंतर निसर्ग वादळग्रस्तांचं आयुष्य कसं बदललं आहे? पाहुयात यावरचा हा एक रिपोर्ट