Modi Sarkaar! मोदी सरकारच्या सात वर्षांतील कामाचा आढावा, 2014 ते 2019 मोदी सरकारचा प्रवास!
एबीपी माझा वेब टीम | 31 May 2021 12:05 AM (IST)

मोदी सरकार सत्तेत येऊन आज सात वर्षे पूर्ण झालीत तर सरकारच्या दुसऱ्या कारकिर्दीला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजप शासित राज्यांतील मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलंय. त्यामध्ये सांगण्यात आलंय की, आज कोणत्याही प्रकारचा जल्लोष साजरा करु नये वा कोणत्याही प्रकारचा उत्सव स्वरुपाचा कार्यक्रम आयोजित करु नये. त्या ऐवजी कल्याणकारी कार्यक्रमाचं आयोजन करावं आणि कोरोना प्रभावित लोकांची मदत करावी.