मनमाडमध्ये शेतकऱ्यांनी घेतलं 50 गुंठ्यात 200 क्विंटल रताळ्याचं उत्पन्न, अडीच ते तीन लाखांचा फायदा
अजय सोनावणे, एबीपी माझा
Updated at:
16 Jul 2021 07:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोनाच्या काळात शेती उत्पादनावर खूपच परिणाम झाला, त्यातही फळ-भाज्या उत्पादनावर कधी चांगला भाव मिळाला तर कधी भाजीपाल्याला भावच मिळाला नाही. मात्र यावर मात करत 50 गुंठ्यात दोनशे क्विंटल आणि हमखास भाव मिळेल या आशेवर नाशिकच्या देवळा तालुक्यातील सटवाईवाडी येथील पगार कुटुंबाने साकरु म्हणजेच रताळी पिकाच उत्पादन घेतलं आणि त्यात अपेक्षेपेक्षा जास्त उत्पादन त्यांना मिळालं आहे.