Nashik Farmer Special Report : नेत्यांनो उघडा डोळे, बघा नीट, शेतकऱ्यांच्या समस्येकडे प्रशासनाची पाठ
abp majha web team | 27 Dec 2022 11:28 PM (IST)

कडाक्याच्या थंडीतही बळीराजाला रात्रीचा दिवस करावा लागतोय आणि यामागचं कारण म्हणजे दिवसा होणारं भारनियमन.... आठवड्यातील चार दिवस दुपारी शेतीसाठी वीजपुरवठा बंद करण्यात येतो आणि रात्री १२ ते सकाळी 9 वाजेपर्यंत वीज पुरवली जाते, दरम्यान पिकाला पाणी दिलं नाही तर पीक वाया जाईल आणि त्यामुळे शेतकऱ्याला रात्री शेतात राबावं लागतंय..तसंच या भागात बिबट्याचा वावर असल्याने शेतकऱ्याला दुहेरी संकटाचा सामना करावा लागतोय.. शेतकऱ्यांच्या या समस्येकडे मात्र प्रशासन दुर्लक्ष करतंय.