Ratnagiri Hapus Mango | 'कोकणाच्या राजा'वर अस्मानी संकट, अवकाळी पावसामुळे हापूसची आवक लांबणीवर
एबीपी माझा वेब टीम | 21 Feb 2021 01:49 PM (IST)

हापूस आणि काजूचं नाव निघालं की सर्वांना आठवण होते ती कोकणची. सध्या सर्वच जण हापूस आणि काजूची आतुरतंने वाट पाहत आहेत. पण सध्या ही प्रतिक्षा आणखी लांबू शकते. त्याला कारण म्हणजे नुकताच झालेला अवकाळी पाऊस. अवकाळी पावसामुळं कोकणातील हापूस, काजूच्या पिकावर मोठं संकट ओढवलंय.