BE Positive | कोल्हापुरातील उत्तरेश्वर थाळी ठरतेय गरिबांचा आधार; अवघ्या 5 रुपयांत जेवण
एबीपी माझा वेब टीम | 21 Apr 2021 04:21 PM (IST)

कोल्हापूर शहरातील गरजूंना उत्तरेश्वर थाळी हा आधार बनत आहे. गेल्या लॉकडाऊन पाहून उत्तरेश्वर पेठेतील तरुण हा उपक्रम राबवत आहेत. याठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने जेवण केवळ 5 रुपयात दिले जाते. डाळ, भात, चपाती, दूध, खीर तसेच रविवारी चिकन आणि बुधवारी अंडी असा मांसाहार देखील पाच रुपयात दिला जातो. लॉकडाऊनमध्ये अनेक नागरिकांच्या जेवणाचे अवघड झाले. अशावेळी अगदी 5 रुपयात पोटभर जेवण देण्याचा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे.