Majha Vishesh विरोधी पक्ष दिवाळखोरीच्या कडेलोटावर उभा आहे का? काँग्रेसचे मित्रपक्ष फक्त बाण सोडणार?
एबीपी माझा वेब टीम | 26 Dec 2020 07:09 PM (IST)

मुंबई : सध्याच्या स्थितीत या देशात विरोधी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. जे वातावरण दिल्लीच्या सीमेवर दिसतंय 30 दिवसापासून शेतकऱ्यांचा प्रश्न सुटलेला नाही. त्यांना कोणीही गांभीर्याने घ्यायला तयार नाही. त्यांच्या प्रश्नांची खिल्ली उडवली जात आहे. दुसरीकडे विरोधीपक्ष विस्कळीत आहे. विरोधी पक्षाने एकत्र येत हुकूमशाही विरोधात आवाज उठवावा, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.