मुंबईने तीन चेंडू आणि सहा विकेट्स राखून विजयासाठीचं 177 धावांचं लक्ष्य गाठलं. मुंबईचा हा पाच सामन्यांमधल्या चौथा विजय ठरला. या विजयासह मुंबईने आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली.
मुंबईने गुजरातवर मिळवलेल्या विजयात महत्त्वाचा ठरला तो कर्णधार रोहित शर्माला गवसलेला सूर. पहिल्या चार सामन्यांमध्ये मिळून रोहितच्या नावावर केवळ नऊ धावा होत्या. त्याच रोहितने गुजरातविरुद्धच्या सामन्यात 29 चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकारासह नाबाद 40 धावांची खेळी केली. त्यानं नितीश राणाच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 85 धावांची आणि कायरन पोलार्डच्या साथीने चौथ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी रचली.
नितीश राणाने 36 चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांसह 53 धावांची, तर पोलार्डने 23 चेंडूंत दोन चौकार आणि तीन षटकारांसह 39 धावांची खेळी उभारली.