भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेवर कोणतंही संकट नाहीः लोढा समिती
एबीपी माझा वेब टीम | 04 Oct 2016 01:06 PM (IST)
नवी दिल्लीः भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यादरम्यान चालू असलेल्या उर्वरित कसोटी आणि वन डे मालिकेवर रद्द होण्याचं सावट आहे. त्यावर आता लोढा समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती लोढा यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. बँकांना बीसीसीआयचे खाते गोठवण्याचे आदेश दिलेले नाहीत. मात्र 30 सप्टेंबरला बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत झालेल्या आर्थिक निर्णयांसंबंधीचे व्यवहार करु नयेत, असे आदेश दिले आहेत, असं स्पष्टीकरण लोढा समितीकडून देण्यात आलं. बीसीसीआयचे बँक खाते गोठवण्यात आले आहेत, त्यामुळे ही मालिका रद्द होऊ शकते, अशी चर्चा होती. मात्र न्यायमूर्ती लोढा यांनी स्पष्टीकरण देत चर्चांना पूर्ण विराम दिला.