श्रीलंकेच्या लकमलने लखाखती कामगिरी केली. 6 षटकांमध्ये 6 निर्धाव आणि 3 विकेट्स घेतल्या. त्यामुळे आजच्या दिवसाचा लकमल हिरो ठरला.
लोकेश राहुल, शिखर धवन आणि विराट कोहली या तिन्ही फलंदाजांना लकमलने एकही धाव न मोजता माघारी धाडलं. त्याचं पृथक्करण होतं सहा षटकं, सहा निर्धाव, एकही धाव न देता तीन विकेट्स.
दरम्यान, पंचांनी पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला, त्या वेळी चेतेश्वर पुजारा 8 धावांवर, तर अजिंक्य रहाणे शून्यावर खेळत होता.
श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज सुरंगा लकमलने ढगाळ हवामान आणि अनुकूल खेळपट्टीचा लाभ उठवून भारताच्या प्रमुख फलंदाजांची फळी कापून काढली.