कोलकाता : इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेमध्ये टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या केदार जाधवला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. कोलकाता वन डेमध्ये इंग्लंडने 5 धावांनी भारतावर विजय मिळवला, मात्र टीम इंडियाने 2-1 ने मालिका खिशात घातली.


कोलकात्याच्या वन डे सामन्यात इंग्लंडनं दिलेल्या 322 धावांचा पाठलाग करताना केदार जाधव पुन्हा एकदा हिरो ठरला. एकाकी झुंज देत केदारने 75 चेंडूंमध्ये 12 चौकार आणि एक षटकार ठोकत 90 धावांची खेळी केली. तुफान फलंदाजी करणारा केदार जाधव अवघा एक चेंडू बाकी असताना बाद झाला आणि भारताच्या विजयाच्या आशा धुसर झाल्या.

इंग्लंडनं 50 षटकांत 8 बाद 321 धावा करुन भारताला विजयासाठी 322 धावांचं आव्हान दिलं होतं. शेवटच्या चेंडूवर विजयासाठी सहा धावांची गरज होती, मात्र भुवनेश्वर विजयाचा शिल्पकार ठरु शकला नाही.

कर्णधार विराट कोहलीनेही अर्धशतक ठोकलं, तर युवराज सिंगनंही 45 धावांची खेळी केली. भारताचा निम्मा संघ 173 धावांत माघारी परतला. आर अश्विनही अवघी एक धाव करुन तंबूत परतला. त्यामुळे भारतीय फलंदाज विजयासाठी काहीसा संघर्ष करावा लागला.

इंग्लंडचा भारतावर 5 धावांनी विजय, मालिका टीम इंडियाच्या खिशात


पुणे वनडेमध्ये कोहलीच्या नेतृत्वात खेळला गेलेला पहिला सामना भारताने खिशात घातला होता. या सामन्यात केदार हा सर्वात जलद शतक ठोकणारा सहावाच भारतीय फलंदाज ठरला आहे. कौतुकाची गोष्ट म्हणजे अवघ्या 13 वनडे सामन्यांचा अनुभव असतानाच त्याने ही मजल मारली.

केदार जाधवने अवघ्या 76 चेंडूंमध्ये 12 चौकार आणि 4 षटकार लगावून 120 धावा रचल्या. केदारच्या तडाखेबाज खेळीमुळे टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर येऊन पोहचली. केदारचं वनडे मधलं हे दुसरंच शतक होतं. 2019 च्या विश्वचषकासाठी मोहऱ्यांची जुळवाजुळव करताना कोहलीची केदार विशेष मेहेरनजर असेल, अशी अटकळ बांधली जात आहे.

संबंधित बातम्या :


क्रॅम्पमुळे केदार कोसळला, मात्र त्याचवेळी ड्रेसिंगरुममधून मेेसेज आला!


केदारने आमचे सर्व डावपेच धुळीस मिळवले : मॉर्गन


कोहलीमुळेच मोठी इनिंग खेळू शकलो : केदार जाधव


केदारला सांगितलं होतं, तू फक्त 150 पर्यंत साथ दे : कोहली


केदारसोबतची भागीदारी विसरु शकणार नाही : कोहली


केदारचं शतक ही भारतीयाने वनडेत ठोकलेली पाचवी फास्टेस्ट सेंच्युरी