MI vs DC, IPL 2022 : अखेरच्या साखळी सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  महत्वाच्या लढतीत नाणेफेक गमावल्यानंतर ऋषभ पंतची नाराजी दिसून आली. मुंबईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवला. डॅनिएल सॅम्स व जसप्रीत बुमराह यांनी डेव्हिड वॉर्नर व मिचेल मार्श यांना तंबूत धाडत दिल्लीच्या अडचणी वाढवल्या.  त्यातच पावरप्लेच्या अखेरच्या षटकात जसप्रीत बुमराहचा भेदक बाऊन्सर पृथ्वी शॉला समजला नाही. पृथ्वी शॉ खाली कोसळला.. चेंडू त्याच्या हाताची कड घेऊन गेला.. विकेटच्या मागे ईशान किशनने जबरदस्त झेल घेतला. पृथ्वी शॉ २४ धावांवर बाद झाला.. जसप्रीत बुमराहच्या भन्नाट बाऊन्सरवर पृथ्वीला तग धरता आला नाही.
  







प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या दिल्लीच्या संघाची सुरुवात खराब झाली आहे. दिल्लीच्या डावातील तिसऱ्याच षटकात जसप्रीत बुमराहनं डेव्हिड वार्नरच्या (5 धावा) रुपात दिल्लीला पहिला धक्का दिला. त्यानंतर मिचेश मार्शही (0 धाव) डेनियल सॅम्सच्या गोलंदाजीचा शिकार ठरला. गेल्या काही सामन्यांपासून संघाबाहेर असलेल्या पृथ्वी शॉ (24 धावा) आजच्या सामन्यात मोठी धावसंख्या करेल, अशी अपेक्षा केली जात होती. मात्र, तोही पावर प्लेच्या अखेरच्या षटकात बाद झाला. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतनं सघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यालाही संघाची धावसंख्या पुढे नेता आली नाही. त्यानं 33 चेंडूत 39 धावा केल्या. दिल्लीकडून रोव्हमन पॉवेलनं सर्वाधिक 43 धावांची खेळी केली. ज्यात चार षटकार आणि एक चौकाराचा समावेश होता. रोव्हमन पॉवेल बाद झाल्यानंतर दिल्लीच्या कोणत्याही फलंदाजाला 20 धावांचा टप्पा गाठता आला नाही. मुंबईकडून जसप्रीत बुमराहनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, रमनदीप सिंहला दोन विकेट्स मिळाल्या. याशिवाय, डेनियल्स सॅम्स, मयांक मार्कंडेय यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.


हे देखील वाचा-