IPL 2023 : गुजरात आणि लखनौ यांच्यात रंगतदार लढत सुरु आहे. हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या आमने सामने आहेत. गुजरातचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे आहे तर लखनौची धुरा कृणाल पांड्या सांभाळत आहे. दोन भाऊ एकाचवेळी नेृतृव करण्याची आयपीएलमध्ये पहिलीच वेळ आहे. याआधी असा पराक्रम आयपीएलमध्ये कधीच घडला नाही. दोन भाऊ खेळलेले आपण पाहिलेय... पण दोन भाऊ एकमेंकाविरोधात नेतृत्व करत असल्याचे पहिल्यांदाच घडलेय. 


युसूफ पठाण आणि इरफान पठाण, मार्श ब्रदर्स, यान्सेन ब्रदर्स यांना आपण आयपीएलमध्ये खेळताना पहिलेय.. पण आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन भाऊ नेतृत्व करत आहे. सोशल मीडियावर दोघांचेही कौतुक होत आहे. नाणेफेकीवेळी दोन्ही भाऊ भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. सामना सुरु होण्यापूर्वी हार्दिक पांड्या याने आपल्या भावना व्यक्त केल्या. हार्दिक पांड्या म्हणाला की, आमच्या कुटुंबासाठी हा नक्कीच अभिमानाचा आणि भावनिक क्षण असेल.. आमचे वडिलांना आमच्यावर नक्कीच अभिमान वाटेल...  


हसी ब्रदर्सने बीग बॅश लीग स्पर्धेत दोन संघाचे नेतृत्व केले होते. त्यानंतर आता पहिल्यांदाच असे घडतेय. आयपीएलमध्ये दोन भावांना खेळताना अनेकदा पाहिलेय.. पण नेतृत्व करताना दोन भावांना पहिल्यांदाच झालेय.. सोशल मीडियावर याची चर्चा सुरु आहे. याबाबत अनेक मिम्स अन् ट्वीट व्हायरल होत आहेत.


 






















GT vs LSG, IPL 2023 : लखनौचा कर्णधार कृणाल पांड्याने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. कृणाल पांड्याने हार्दिक पांड्याच्या गुजरात संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेय. लखनौचा संघ प्रथम गोलंदाजी करणार आहे. सामन्यानंतर बोलताना हार्दिक पांड्या भावनिक झालेला दिसला. दोन भाऊ आयपीएलमध्ये पहिल्यांदाच नेतृत्व करत आहेत. 


GT vs LSG Head To Head : हेड टू हेड आकडेवारी
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये लखनौ (LSG) आणि गुजरात (GT) या संघांमध्ये आतापर्यंत तीन सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये गुजरात संघाचं पारड जड दिसून आलं आहे. गुजरात टायटन्स संघाने तिन्ही सामने जिंकले आहेत, पण लखनौला एकही सामना जिंकता आलेला नाही. आजच्या सामन्यात लखनौ नवा इतिहास रचणार की गुजरात पुन्हा बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


Narendra Modi Stadium Pitch Report : नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?


अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हींसाठी पूरक आहे. सीमारेषा दूर असल्यामुळे फलंदाजांना षटकार-चौकार मारताना मेहनत घ्यावी लागते. तसेच चौकार षटकाराच्या नादात विकेट जाण्याची शक्यता असते. या मैदानावर एकेरी दुहेरी धावांचे तेवढेच महत्व आहे. या मैदानावर कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतात. प्रथम फलंदाजी करणारा संघ मोठी धावसंख्या उभारु शकतो.