लंडन : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकात मिताली राजची टीम इंडिया आज श्रीलंकेशी भिडणार आहे. भारताच्या महिला ब्रिगेडनं सलग तीन सामन्यांत विजय मिळवला आहे. इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान या तीन संघांना धूळ चारली आहे.


श्रीलंकेला हरवल्यास सेमी फायनलमध्ये पोहचण्याची संधी भारताला मिळणार आहे. डर्बीच्या काऊंटी ग्राऊंडवर हा सामना खेळवला जाईल. मराठीमोळी स्मृती मानधना, पूनम राऊत यांच्यासह कर्णधार मिताली राज, एकता बिस्त, हरमनप्रीत कौर आणि झूलन गोस्वामी यांच्या खेळाकडे सर्वांच्या नजरा असतील.

भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजच्या संघाने तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. या सामन्यात भारतीय महिलांनी पाकचा 95 धावांनी धुव्वा उडवला होता.

संबंधित बातम्या :


एकही धाव न देता 4 विकेट, महिला गोलंदाजाचा विश्वविक्रम


भारताकडून पाकिस्तान महिला संघाचा 74 धावात खुर्दा


क्रिकेटच्या मैदानात भारत-पाक पुन्हा भिडणार!


स्मृती मंधानाचं खणखणीत शतक, भारतीय महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडिजवर विजय


‘सांगलीची स्मृती भारतीय महिला संघाची सचिन’


उजव्या हाताने लिहिणे, डाव्या हाताने तडाखे… स्मृती मानधनाचा प्रवास!


बॅटिंगआधी पुस्तक का वाचत होते, मिताली म्हणते…!


मिताली राजने अर्धशतकांच्या बाबतीत विराटलाही मागे…