विश्वचषकात मिताली राजच्या ब्रिगेडचा सामना श्रीलंकेशी
एबीपी माझा वेब टीम | 05 Jul 2017 08:25 AM (IST)

लंडन : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकात मिताली राजची टीम इंडिया आज श्रीलंकेशी भिडणार आहे. भारताच्या महिला ब्रिगेडनं सलग तीन सामन्यांत विजय मिळवला आहे. इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान या तीन संघांना धूळ चारली आहे. श्रीलंकेला हरवल्यास सेमी फायनलमध्ये पोहचण्याची संधी भारताला मिळणार आहे. डर्बीच्या काऊंटी ग्राऊंडवर हा सामना खेळवला जाईल. मराठीमोळी स्मृती मानधना, पूनम राऊत यांच्यासह कर्णधार मिताली राज, एकता बिस्त, हरमनप्रीत कौर आणि झूलन गोस्वामी यांच्या खेळाकडे सर्वांच्या नजरा असतील. भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजच्या संघाने तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. या सामन्यात भारतीय महिलांनी पाकचा 95 धावांनी धुव्वा उडवला होता.