बीसीसीआयची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. त्याआधी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत बीसीसीआयशी संलग्न संस्थांना मोठा निधी मंजूर केला.
लोढा समितीच्या आदेशाची अंमलबजावणी केल्यास बीसीसीआय कोणताही परतावा देऊ शकणार नाही. त्यामुळे पुढच्या सर्वच सामन्यांवर गंडांतर येऊ शकतं. भारत आणि न्यूझीलंडदरम्यान अजून एक कसोटी सामना, आणि पाच वनडे सामने खेळवले जाणार आहेत. पण ते सर्वच सामने धोक्यात आले आहेत.