या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या मनदीप सिंहने अर्धशतक झळकावलं. मनदीपने 40 चेंडूत सहा चौकार आणि एका षटकारासह नाबाद 52 धावांची खेळी उभारली. तर लोकेश राहुलने 40 चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 47 धावा ठोकल्या. मनदीप आणि राहुलने 103 धावांची अभेद्य भागीदारी रचून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
बरिंदर सरन आणि जसप्रित बुमराने भारताच्या विजयाचा पाया घातला. सरनने दहा धावांच्या मोबदल्यात चार विकेट्स काढून झिम्बाब्वेच्या आघाडीच्या फळीचं कंबरडं मोडून ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये आपलं पदार्पण साजरं केलं. तर जसप्रीत बुमराने 11 धावांत तीन विकेट्स काढल्या.
धवल कुलकर्णीने एक विकेट काढून आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी20 क्रिकेटमध्ये पदार्पणात समाधानकारक कामगिरी बजावली. भारतीय गोलंदाजांनी झिम्बाब्वेला 20 षटकांत नऊ बाद 99 धावांवर रोखण्याची कमाल केली.