अजून एका षटकात सहा षटकार मारण्याबाबत गांभीर्याने विचार केलेला नाही. यापूर्वी तीन चेंडूत तीन षटकार ठोकले आहेत. मात्र चौथा षटकार ठोकला नाही. कारण त्याची गरज नव्हती. कधी सहा चेंडूत सहा षटकार मारण्याची परिस्थिती आली, तर त्या दिवशी मी तसं नक्की करीन, असं हार्दिक पंड्या म्हणाला.
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत पंड्याने पदार्पणातच अर्धशतक ठोकलं. यावेळी आपण कसोटीत नव्हे, तर वन डेत खेळल्यासारखी फलंदाजी करत होतो, असं पंड्या म्हणाला.
पंड्याने श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत 49 चेंडूत 50 धावा केल्या. याच धावांच्या बळावर भारताने 600 धावांचा टप्पा पूर्ण केला.