Team India in WC : स्फोटक सलामीवीर शेफाली वर्माच्या (Captain Shefali Verma) नेतृत्वाखाली 19 वर्षांखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने (Under 19 Womens Cricket Team) T20 विश्वचषक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत फायनल गाठली आहे. सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड संघाला 8 विकेट्सने मात देत भारताने फायनलमध्ये एन्ट्री घेतली आहे. आता भारतासमोर इंग्लंडचं आव्हान आहे.याआधी टीम इंडियाने सुपर सिक्समध्ये करो या मरोच्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवत उपांत्य फेरीत स्थान पक्कं केलं होत. 


अंडर-19 महिला टी-20 विश्वचषकाची फायनल आज (29 जानेवारी) पार पडणार असून भारताचा सामना बलाढ्य इंग्लंडशी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना म्हणजेच आज 29 जानेवारी रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी 5.15 वाजता होणार आहे. दक्षिण आफ्रिकेतील पॉचेफस्ट्रुम येथे हा सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही संघाचा स्पर्धेतील फॉर्म पाहता ही फायनल अगदी चुरशीची आणि रंगतदार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


भारतीय वर्ल्डकपमधील संघाची कामगिरी 


अंडर-19 महिला T20 विश्वचषक 2023 मध्ये (Under 19 Womens T20 World Cup) भारताची कामगिरीही (Team India) देखील चांगली झाली आहे. भारताचा संघ ड गटात होता. यादरम्यान टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती आणि स्कॉटलंडचा पराभव केला. यानंतर सुपर सिक्सच्या पहिल्या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने दमदार पुनरागमन करत श्रीलंकेचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. ज्यानंतर स्पर्धेत एकही सामना न गमावलेल्या न्यूझीलंडला भारतानं आठ विकेट्स राखून मात देत सामना जिंकला आणि फायनलमध्ये प्रवेश मिळवला.


कधी, कुठे पाहाल सामना?


भारत आणि न्यूझीलंड हा महिला अंडर 19 विश्वचषकातील सामना आज अर्थात रविवारी 29 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार भारत विरुद्ध इंग्लंड हा सामना स्थानिक वेळेनुसार दुपारी 1.45 मिनिटांनी तर भारतीय वेळेनुसार सायंकाळी 5.15 वाजता दक्षिण आफ्रिकेतील पॉचेफस्ट्रुम येथे खेळवला जाणार आहे.  


सेमीफायनलचा लेखा-जोखा


सेमीफायलनमध्ये भारतानं न्यूझीलंडचा पराभव केला. या सामन्याचा विचार करता भारताने भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. न्यूझीलंड संघाला स्वस्तात रोखून नंतर आक्रमक खेळाच्या जोरावर विजय मिळवण्याची भारताची रणनीती होती. जी यशस्वी देखील झाली. अवघ्या 107 धावाच न्यूझीलंडचा संघ 20 षटकांत करु शकला. प्लिमर हिने सर्वाधिक 35 धावा यावेळेस केल्या. भारताकडून परश्वी चोप्राने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तितास सिद्धू, शेफाली वर्मा, मन्नत कश्यप, अर्चना देवी यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. ज्यानतर फलंदाजीला आलेल्या भारताने सुरुवातीपासून आक्रमक खेळ दाखवला. ज्यामुळे केवळ 14.2 षटकांत दोन विकेट्स गमावून भारताने 110 धावा करत 8 विकेट्सनी मॅच जिंकली. यावेळी श्वेता शेहरावत हिने नाबाद 61 धावांची तर शेफालीने 10 सौम्याने 22 आणि गोंगादी त्रिशाने नाबाद 5 धावांची खेळी केली. ज्यामुळे भारताने 8 विकेट्सने सामन्यात विजय मिळवला.


हे देखील वाचा-