भारतात क्रिकेटवर वेड्यासारखी प्रेम करणारी लोकं आहेत. चांगली कामगिरी केली तर चाहते डोक्यावर घेऊन नाचतील पण, सामन्यात खराब कामगिरी केल्यास त्यांचे जगणे अवघड करुन टाकतात. त्यांच्या या खराब कामगिरीबद्दल ते या खेळाडूंच्या पत्नी किंवा गर्लफ्रेंडलाही ट्रोल करतात. अलीकडेच बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मन्सूर अली खान पटौदी यांची पत्नी शर्मिला टागोर यांनी एका मुलाखतीदरम्यान उघड केले आहे की तिच्या पतीच्या खराब खेळासाठी तिला बर्‍याच वेळा दोषी ठरविण्यात आले आहे.


पतौडी आणि शर्मिला टागोर यांचे लग्न 1968 साली झाले होते. शर्मिला टागोर यांनी तिच्या एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, "त्यांच्याकडून (पतौडी) कधी खेळाच्या मैदानावर चूक झाली की लोक मला दोष द्यायचे." लोकं अनेक प्रकारे प्रतिक्रिया देत असत. काही म्हणायचे की माझ्यामुळे त्यांचं खेळाकडे दुर्लक्ष होतंय तर कधीकधी मला धमक्याही मिळाल्यात. मी स्टेडियममध्ये लोकांच्यात बसून सामना पहायचे. यावरुन माझ्या वडिलांनीही मला झापलं होतं."


कोहलीच्या खराब कामगिरीमुळे अनुष्का झाली होती ट्रोल
जेव्हा जेव्हा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली खराब कामगिरी करतो तेव्हा चाहते त्याची पत्नी अनुष्का शर्माला यासाठी ट्रोल करायला लागतात. 2014 मध्ये इंग्लंड दौर्‍यावर विराट कोहलीच्या खराब कामगिरीनंतर अनुष्काला इतके ट्रोल केले गेले होते की विराट स्वतःच तिच्या बचावासाठी आला. गेल्या वर्षी, आयपीएल दरम्यान, महान भारतीय फलंदाज सुनील गावस्करनेही अनुष्का आणि विराटबद्दल विधान केले होते, यामुळे मोठी खळबळ माजली होती. तर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसोबतही असेच काहीसे घडले, जेव्हा आयपीएल 2020 मध्ये तिची मुलगी जीवाला तिच्या खराब कामगिरीबद्दल धमकी देण्यात आली होती.


1996 च्या विश्वचषकात बॉलिवूड अभिनेत्री संगीत बिजलानी यांच्या बाबतीतही असेच काहीसे घडले होते. बिजलानी त्यावेळी भारतीय संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनला डेट करत होती. वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये जेव्हा भारत पराभूत झाला होता, तेव्हा या पराभवासाठी चाहत्यांनी संगीता बिजलानीला जबाबदार धरले होते.