Ranji Trophy : मुंबईचं 42 वं विजेतेपद पटकावण्याचं स्वप्न मध्य प्रदेशने मोडलं असलं तरी मुंबई संघाच्या सरफराज खाननं रणजी चषक स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करत मालिकावीराचा पुरस्कार मिळवला. सरफराजनं 122.75 च्या सरासरीने 4 शतकं ठोकली. 982 धावा करणाऱ्या सरफराजचा 275 सर्वोच्च स्कोर ठरला. सहा सामन्यांच्या नऊ डावात सरफराजने या 982 धावा केल्या आहेत.


सरफराज खाननं ठोकली 4 शतकं


रणजी ट्रॉफी 2021-22 (Ranji Trophy Season 2021-22) या स्पर्धेचं जेतेपद मुंबईच्या (Mumbai) हातातून हुकलं. 41 वेळा विजयी मुंबईला 42 व्यांदा विजय मिळवता आला नाही. पण मुंबईचा फलंदाज सरफराज खान (Sarfaraz Khan) याने मात्र अप्रतिम फलंदाजी करत मालिकावीराचा पुरस्कार मिळवला.त्याने या स्पर्धेत 4 शतकं आणि 2 अर्धशतकं ठोकली. अंतिम सामन्यात मुंबई जरी पराभूत झाली असली तरी सरफराजनं या सामन्यातही पहिल्या डावात शतक ठोकलं.


122.75 च्या सरासरीने ठोकले 982 रन


संपूर्ण मालिकेत सरफराज खानने (Sarfaraz Khan) त्याचं बॅटिंग अॅव्हरेजही कमाल ठेवलं. सरफराजने 6 सामन्यातील 9 डावात 122.75 च्या सरासरीने आणि 69.54 च्या स्ट्राईक रेटने (Strike Rate) धावा कुटल्या. 982 धावा करणाऱ्या सरफराजचा 275 सर्वोच्च स्कोर ठरला, यावेळी त्याने 93 चौकार आणि 19 षटकार लगावले.


6 विकेट्सने मध्य प्रदेश विजयी


मुंबई आणि मध्य प्रदेश यांच्यातील रणजी ट्रॉफी फायनल सामना बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबईच्या संघानं प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 374 धावा केल्या. प्रत्युत्तरात मध्य प्रदेशच्या संघानं पहिल्या डावात सर्वबाद 536 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या मुंबईच्या संघाला खास फलंदाजी करता न आल्याने ते 269 धावांवर सर्वबाद झाले. ज्यानंतर 108 धावांच लक्ष्य मध्य प्रदेश संघाने दुसऱ्या डावात 4 विकेट्स गमावत पूर्ण केलं आणि चषक नावे केला आहे. 


हे देखील वाचा-