मुंबई : मैदानात अफलातून क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जाणारा भारतीय संघाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने हेलो अॅपवर केलेल्या लाईव्हमध्ये सध्याच्या भारतीय संघाबद्दल आपले विचार मांडले. कैफच्या मते सध्याच्या भारतीय संघात एकजुटतेचा अभाव आहे. सतत खेळाडूंची होणारी आदलाबदली आणि सतत नवे नवे खेळाडू संघात येणे यामुळे भारताचा संघ अजूनही हवा तसा तयार झाला नाहीय. त्यामुळे सर्व महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघाला म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाहीय. 2013 नंतर भारताने आयसीसीची कोणतीही मोठी स्पर्धा जिंकली नाहीय. यातून हे स्पष्ट दिसून येतंय की भारतीय संघामध्ये एकजुटपणाची कमतरता जाणवत आहे.


आमच्यावेळी सौरव गांगुलीने सर्व खेळाडूंना एकत्र ठेवण्यात मोठी भूमिका बजावली होती. आजही आपण पाहिलेत तर बीसीसीआय सारख्या मोठ्या संस्थेचे अध्यक्षपद स्विकारल्यावर दादाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे. पुढील काळात दादा भारतीय क्रिकेटमध्ये पारदर्शकता आणेल असा विश्वास मला आहे. कैफ बोलला की आमच्या काळात अनेक खेळाडू आजच्यासारखे फिट नसले तरी ते उत्तम क्रिकेटर होते आणि त्यांनी स्वत:ला सिद्ध केले होते.


...म्हणून वडिलांनी लाच देण्यास नकार दिला होता; विराट कोहलीचा धक्कादायक खुलासा!


टी 20 विश्वचषकाविषयी बोलताना कैफ म्हणाला की, भारतीय संघात आता एक सुटसुटितपणा आणि समन्वय येणे गरजेचे असून कोणते खेळाडू संघात खेळणार हे निश्चित करणे गरजेचे आहे. भारतीय संघाला शॉर्ट फॉरमॅटमध्ये खेळताना अनेक आव्हाने आहेत. त्यामुळे विराटचे नेतृत्व आणि त्याचे निर्णय खुप महत्त्वाचे आहे. माझ्या मते भारताचा महत्त्वाचा खेळाडू महेंद्रसिंग धोनी संघात असणे गरजेचे आहे. धोनी शिवाय भारतीय संघ अपूर्ण आहे. जेव्हा धोनी स्वत: सांगेल की आता मी थकलो आता निवृत्त होतो तेव्हा मी समजेन त्याच्यातील क्रिकेट संपले आहे.


coronavirus | कोरोनाचा गैरसमज दूर करण्यासाठी क्रिकेटचे आयोजन, विजेत्या संघाला कोंबड्यांचं बक्षीस