IND vs SL, 3rd T20 : भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तिसरा टी20 (3rd T20) सामना आज खेळवला जात आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकल्यामुळे भारताने आधीच मालिकेत (India won Series) विजय मिळवला आहे. पण आज भारताला श्रीलंकेला व्हाईट वॉश देण्याची उत्तम संधी आहे. तर दुसरीकडे श्रीलंका शेवटचा सामना किमान जिंकून शेवट गोड करण्यासाठी मैदानात उतरेल. तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने संघात बरेच बदल केले आहेत. भुवनेश्वर, जसप्रीत, चहल या अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तर रवी बिश्नोई, आवेश खान, मोहम्मद सिराज यांना संधी देण्यात आली आहे. 


भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिले दोन्ही सामना भारताने जिंकले. यात पहिला सामना भारताने 62 धावांनी तर दुसरा सामना 7 विकेट्सनी जिंकला. दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकल्यामुळे तिसऱ्या सामन्यातही भारताचं पारडं जड आहे. पण भारताचा महत्त्वाचा खेळाडू ईशान किशन (Ishan Kishan) मात्र दुसऱ्या सामन्यातील दुखापतीमुळे आजच्या सामन्याला मुकणार आहे.


तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी भारतीय संघ (India’s T20I squad) 


रोहित शर्मा (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, हर्षल पटेल, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, आवेश खान.



हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha