India vs South Africa 5th T20 Bengaluru : भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यामध्ये आज निर्णायक सामना होणार आहे. करो या मरो सामन्यात दोन्ही संघाला विजय गरजेचा आहे. मालिका विजय मिळवण्यासाठी बंगळुरुच्या चिन्नस्वॉमी स्टेडिअमवर दोन्ही संघ मैदानात भिडणार आहे. सामन्यावर पावसाचे संकट घोंगावत आहे, तरीही कोण बाजी मारणार? याची चर्चा सुरु झाली आहे. याबाबतच एक महत्वाची आकडेवारी समोर आली आहे. मागील 11 करो या मरो अथवा निर्णायक सामन्यात भाराताला तब्बल 9 वेळा विजय मिळालाय. त्यामुळे आजच्या सामन्यात भारताचे पारडे जड मानले जातेय. सुरुवातीचे दोन सामन्यात पराभव मिळाल्यानंतरही भारतीय संघाने लागोपाठ दोन सामने जिंकत मालिकेत बरोबरी साधली आहे. या मालिकेतील आज अखेरचा सामना होणार आहे.


 2016 पासून भारतीय संघाने 11 निर्णायक अथवा करो या मरो सामने खेळले आहेत. यामध्ये भारतीय संघाला 9 वेळा विजय मिळलाय. त्यामुळे आजच्या सामन्यातही पावसाचा व्यत्यय न आल्यास भारतीय संघ बाजी मारेल, असे क्रीडा तज्ज्ञांचं मत आहे. दुसरीकडे कर्णधार टेम्बा बावुमा दुखापतग्रस्त झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या चिंतेत वाढ झाली आहे. निर्णायक सामन्यात केशव महाराज अथवा डेविड मिलर याच्याकडे कर्णधारपद सोपवलं जाऊ शकते.  


दरम्यान, राजकोट जिंकल्यानंतर भारतीय संघ अखेरच्या टी20 सामन्यासाठी बंगळुरूला पोहोचली आहे. बीसीसीआयने त्याचा व्हिडीओही पोस्ट केलाय. निर्णायक सामना जिंकून मालिका विजयाच्या निर्धाराने दोन्ही संघ मैदानात उतरली.  आजपर्यंत भारताने घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका कधीच जिंकले नाही. दक्षिण आफ्रिकेने यापूर्वी दोनदा भारताचा दौरा केला आहे. यामध्ये भारताचा पराभव झालाय. आजचा सामना जिंकून भारतीय संघ इतिहास रचणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 


दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात भारताची कामगिरी
दक्षिण आफ्रिकेचा संघ तिसऱ्यांदा टी-20 मालिका खेळण्यासाठी भारतात आलाय. दरम्यान, 2015/16 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील संघाला 2-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. या तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना पावसामुळं रद्द झाला. त्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली, 2019/20 मध्ये मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली. या मालिकेतील अखेरचा सामना पावसामुळं रद्द झाला. 


ऋषभ  पंतकडं इतिहास रचण्याची संधी
पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतानं दोन तर, दक्षिण आफ्रिकेच्या संघानं दोन सामने जिंकले आहेत. यामुळं या मालिकेतील पाचवा सामना जिंकणार संघ मालिका खिशात घालेल. भारतानं हा सामना जिंकला तर दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर टी-20 मालिकेत हरवण्याची ही पहिलीच वेळ असेल. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात टी-20 मालिका जिंकणार ऋषभ पंत पहिला कर्णधार ठरेल.मालिकेच्या सुरुवातीला भारतीय गोलंदाजांची कामगिरी निराशाजनक होती. मात्र, गेल्या दोन सामन्यांपासून सर्व गोलंदाज लयीत असल्याचे दिसत आहे.


भारत- दक्षिण आफ्रिका हेट टू हेड रेकार्ड
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण 19 सामने खेळले गेले. त्यापैकी भारतीय संघानं 11 सामने जिंकले आहेत. तर, आठ सामन्यात पराभव पत्कारावा लागलाय. महत्वाचं म्हणजे, भारतीय संघानं मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध साठ सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामने जिंकले आहेत. तर, पाच सामन्यात पराभव स्वीकारला आहे.