IND vs SA, 5th T20: पाच टी-20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर भारतानं पुढील दोन्ही सामन्यात दक्षिण आफ्रिकेला (India vs South Africa) धुळ चाखली. या कामगिरीसह भारतानं मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. आज या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना बंगळुरूच्या (Bengaluru) एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (M.Chinnaswamy Stadium) खेळला जाणार आहे. आजच्या सामन्या विजय मिळवून मालिका खिशात घालण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न आहे. या मालिकेत भारताचं नेतृत्व करणाऱ्या ऋषभ पंतकडं इतिहास रचण्यासाठी संधी आहे. जेव्हा दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात टी-20 मालिका खेळण्यासाठी आला, तेव्हा त्यांनीच मालिका जिंकली आहे.


दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात भारताची कामगिरी
दक्षिण आफ्रिकेचा संघ तिसऱ्यांदा टी-20 मालिका खेळण्यासाठी भारतात आलाय. दरम्यान, 2015/16 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील संघाला 2-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. या तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना पावसामुळं रद्द झाला. त्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली, 2019/20 मध्ये मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली. या मालिकेतील अखेरचा सामना पावसामुळं रद्द झाला. 


ऋषभ  पंतकडं इतिहास रचण्याची संधी
पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतानं दोन तर, दक्षिण आफ्रिकेच्या संघानं दोन सामने जिंकले आहेत. यामुळं या मालिकेतील पाचवा सामना जिंकणार संघ मालिका खिशात घालेल. भारतानं हा सामना जिंकला तर दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर टी-20 मालिकेत हरवण्याची ही पहिलीच वेळ असेल. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात टी-20 मालिका जिंकणार ऋषभ पंत पहिला कर्णधार ठरेल.मालिकेच्या सुरुवातीला भारतीय गोलंदाजांची कामगिरी निराशाजनक होती. मात्र, गेल्या दोन सामन्यांपासून सर्व गोलंदाज लयीत असल्याचे दिसत आहे.


भारत- दक्षिण आफ्रिका हेट टू हेड रेकार्ड
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण 19 सामने खेळले गेले. त्यापैकी भारतीय संघानं 11 सामने जिंकले आहेत. तर, आठ सामन्यात पराभव पत्कारावा लागलाय. महत्वाचं म्हणजे, भारतीय संघानं मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध साठ सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामने जिंकले आहेत. तर, पाच सामन्यात पराभव स्वीकारला आहे.


हे देखील वाचा-