India Beats Australia: सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) वादळी खेळीच्या जोरावर भारतानं निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्स राखून पराभव केलाय. हैदराबादच्या (Hyderabad) राजीव गांधी स्टेडियमवर (Rajiv Gandhi International Stadium) खेळण्यात आलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 187 धावांचं लक्ष्य ठेवलं. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघानं एक चेंडू राखून हा सामना जिंकला. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-1 अशी आघाडी घेत मालिका जिंकलीय.


भारत- ऑस्ट्रेलिया सामन्यातील 10 महत्वाचे मुद्दे-


- नाणेफेक जिंकून भारतानं ऑस्ट्रेलियाच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. 


- सलामीवीर कॅमेरून ग्रीन ऑस्ट्रेलियाच्या संघाला चांगली सुरुवात करून दिली. 


- ऑस्ट्रेलियाच्या डावातील पाचव्या षटकातील अखेरच्या षटकात भुवनेश्वर कुमारनं कॅमरूनला बाद करून ऑस्ट्रेलियाच्या संघाला बॅकफूटवर ढकललं.


- अखेरच्या काही षटकात टीम डेव्हिड आणि डॅनियल सॅम्सनं जोरदार फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाच्या संघाला 187 धावसंख्येपर्यंत पोहचवलं. 


- भारताकडून अक्षर पटेलनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि हर्षल पटेल यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स प्राप्त झाली.  


- ऑस्ट्रेलियाच्या संघानं दिलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. भारताचा सलामीवीर केएल राहुल अवघ्या एका धावांवर झेलबाद झाला.


- रोहित शर्मानं भारतीय संघाची धावसंख्या पुढं नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, डॅनियल सॅम्सच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना तोही बाद झाला.


- यानंतर विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव भारताच्या विजयाचा विडा उचलत संघाचा डाव सावरला. 


- चौदाव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर सूर्यकुमार झेल बाद झाल्यानंतर विराट कोहलीनं एक बाजू संभाळत भारताच्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर घेऊन गेला.


- भारताला दोन चेंडूत चार धावांची गरज असताना हार्दिक पांड्यानं चौकार मारून संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं.


हे देखील वाचा-