त्याआधी, या सामन्यात भारताच्या पूनम राऊतनं कर्णधार मिताली राजच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 157 धावांची मोठी भागीदारी रचली त्यात मिताली राजचा वाटा होता 69 धावांचा. पूनमनं 136 चेंडूंत 11 चौकारांसह 106 धावांची खेळी उभारली. तिचं हे वन डे कारकीर्दीतलं दुसरं शतक ठरलं.
पूनम आणि मिताली बाद झाल्यावर भारतीय संघाची घसरगुंडी उडाली. भारताला 50 षटकांत सात बाद 226 धावांचीच मजल मारता आली. ऑस्ट्रेलियानं 8 गडी आणि 29 चेंडू राखून भारतावर सहज विजय मिळवला.
संबंधित बातम्या:
मुंबईकर पूनम राऊतचं ऑस्ट्रेलियाविरुद्ध खणखणीत शतक