शशांक मनोहर यांनी आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पद रिक्त होतं. त्यानंतर ठाकूर हे बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी अर्ज करणारे एकमेव उमेदवार होते.
बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा उमेदवार ठरवण्याचा अधिकार यंदा पूर्व विभागाकडे होता. म्हणजेच अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराला पूर्व विभागातील किमान एका संघटनेकडून शिफारस गरजेची होती. पण पूर्व विभागातील बंगाल, ओरिसा, आसाम, झारखंड, त्रिपुरा आणि नॅशनल क्रिकेट क्लब या सहाही संघटनांनी ठाकूर यांनाच पाठिंबा दिल्यामुळे शशांक मनोहर यांच्यानंतर अनुराग ठाकूर बीसीसीआयची सूत्रं स्वीकारणार हे निश्चित झालं होतं.