'कविता' जेव्हा 'कुंचला' होते.. डॉ. विठ्ठल वाघ यांच्या चित्रांतून बागेच्या भिंती झाल्या 'बोलक्या'
डॉ. विठ्ठल वाघ.. मराठी साहित्याच्या प्रांतातलं मोठं नाव. 'काया मातीत मातीत तिफन चालते' या त्यांच्या कवितेनं मराठी मनावर अक्षरश: कायमचं गारूड घातलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'वाघामुळं जंगलाला शोभा येते', असं म्हटलं जातं. साहित्यातल्या या वाघामुळे ओसाड जागेची 'बाग' झालेल्या या जागेलाही शोभा आली होती.
पुढे त्यांनी बागेच्या भिंतींना रंगरंगोटी सुरू केली. अन् हळू-हळू या बगिच्याच्या भिंती 'बोलायला' लागल्यात.
ही ओसाड जागा डॉ. वाघांच्या घरापासून अगदी काही पावलांवर. मार्च महिन्यात सकाळ-संध्याकाळ वाघांनी येथे काम करायला सुरूवात केली.
डॉ. विठ्ठल वाघांच्या समर्थ लेखणीतून आलेल्या अशा अनेक कवितांनी शेतकऱ्यांच्या दु:खाला बोलतं केलं आहे. म्हणूनच त्यांना मराठी साहित्य वर्तुळात 'महाराष्ट्राचं लोककवी' म्हटलं जातं.
विठ्ठल वाघांच्या श्रमप्रतिष्ठेतून हा कायापालट झाला होता.
आधी येथील काटेरी झाड-झुडपं साफ केली. मोठ्या झाडांभोवती आकर्षक पद्धतीनं दगड रचलेत. प्रत्येक दिवस ही ओसाड जागा नवं रूप घेऊन समोर येत होती.
डॉ. वाघांना हे चित्रं तेथून येता-जाता पार अस्वस्थ करायचं. ती जागा स्वच्छ झाली पाहिजे. तिथे सुंदर झाडं आणि फुलांचा बगिचा फुलला पाहिजे, असं त्यांना नेहमी मनोमन वाटायचं.
लॉकडाऊनच्या काळात डॉ. वाघांच्या हातून एक असंच मोठं सृजनात्मक काम उभं राहीलं आहे. मात्र, हे काम त्यांच्यातील साहित्यिकापेक्षा त्यांची फार वेगळी ओळख सांगणारं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -