उन्हाळ्यात 'या' फळभाज्यांचे सेवन करा, व्हिटॅमिनची कमतरता भासणार नाही
शरीर निरोगी आणि तंदुरूस्त राहण्यासाठी उत्तम आहार असणे गरजेचे आहे. आणि हाच आहार रंगांतून जपणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात रंगीबेरंगी भाज्या आणि फळांचा समावेश करणं गरजेचं आहे. अन्नामध्ये या रंगांना विशेष महत्त्व आहे. यासाठी तुम्ही लाल, पिवळ्या, हिरव्या आणि केशरी रंगांच्या फळे आणि भाज्या खाव्यात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभोपळा - भोपळा ही सर्व ऋतूंमध्ये सहज उपलब्ध होणारी एक भाजी आहे. भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन ए चांगल्या प्रमाणात आढळते.
भोपळा खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. 100 ग्रॅम भोपळ्यामध्ये फक्त 26 कॅलरीज असतात.
पपई हे फळ आरोग्यदृष्ट्या खूप फायदेशीर मानले जाते. कारण पपईमध्ये अनेक गुणधर्म असतात.
पपई - पपई हे सर्व ऋतूंमध्ये उपलब्ध असलेले फळ आहे. पपईमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. यात पपेन आणि फायबर नावाचे पाचक एंझाइम असते, जे पोट चांगले ठेवते.
टोमॅटो खूप रसाळ असल्याने यातून भरपूर व्हिटॅमिन्स मिळतात.
टोमॅटो - टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडंट्स सर्वाधिक आढळतात. याशिवाय ते व्हिटॅमिन ए चा चांगला स्रोत आहे. टोमॅटोमध्ये लाइकोपीन असते ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.
सोयाबीन - व्हिटॅमिन ए ची कमतरता पूर्ण करण्यासाठी सोयाबीनचे सेवन करा. सोयाबीनमधून शरीराला प्रथिने, खनिजे, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन ए चांगल्या प्रमाणात मिळतात. सोयाबीनला तुमच्या आहाराचा भाग बनवा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.