नुकतीच समझौता एक्सप्रेस पुन्हा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील रेल्वे विभागांनी समझौता एक्सप्रेसच्या फेऱ्या पूर्ववत करण्यासाठी अनुकूल पावले उचलली आहेत. समझौता एक्सप्रेस आज लाहोरला गेल्यानंतर उद्या पुन्हा लाहोरवरुन दिल्लीसाठी रवाना होईल.
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे भारतीय जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण वाढले आहे. 27 फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. भारतीय हवाई दलाने बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या अड्ड्यांवर बॉम्बफेक केली. यामध्ये जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे 350 दहशतवादी ठार केले.