उरी हल्ला भारतानेच घडवून आणला, पाक संरक्षण मंत्री पुन्हा बरळले
एबीपी माझा वेब टीम | 28 Sep 2016 11:31 AM (IST)

इस्लामाबादः पाकिस्तानला लक्ष्य करण्यासाठी उरी हल्ल्याची योजना भारतानेच आखली होती, असं वादग्रस्त विधान पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केलं आहे. target="_blank">डॉन न्यूज या पाकिस्तानी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ख्वाजा आसिफ यांनी मुक्ताफळं उधळली आहेत. काश्मीरप्रश्नावर भारतच गंभीर भूमिका घेत नसल्याचा आरोप आसिफ यांनी केला आहे. भारताविरोधात अनेक पुरावे पाकिस्तानकडे आहेत, ज्यावरुन भारताची दुटप्पी भूमिका दिसून येते, अशी मुक्ताफळे आसिफ यांनी उधाळली. परराष्ट्र मंत्री सुष्मा स्वराज यांनी केलेल्या भाषणाने आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानचा चेहरा उघडा पडल्याने त्यांचं भारतावर आरोपसत्र सुरु झालं आहे. यापूर्वी आसिफ यांनी एका टीव्ही मुलाखतीत भारतावर आण्विक हल्ला करण्याची धमकी दिली होती. जागितक पातळीवर पाकिस्तानला एकटं पाडण्याचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. त्यावरही आसिफ यांनी टिप्पणी केली. भारताला पाकिस्तानवर आरोप लावून कोणत्याही देशाचं समर्थन मिळालेलं नाही. याऊलट पाकिस्तानला चीनने जाहीर पाठिंबा दिला आहे, असं आसिफ यांनी सांगितलं. पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्यासाठी अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये मोहीम राबवली आहे. पण काही ठराविक देशांच्या पाठिंब्यामुळे पाकिस्तानला दहशतावादी राष्ट्र घोषित केलं जाऊ शकत नाही, असंही विधान आसिफ यांनी केलं.