- शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा.
- स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा.
- शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा.
- शेतकर्यांना पेन्शन योजना लागू करावी.
रस्त्यावर घडणारा हिंसाचार नव्हे, शेतकऱ्यांच्या पोटातील भूकेची आग : शिवसेना
एबीपी माझा वेब टीम | 05 Jun 2017 05:44 PM (IST)
मुंबई : शेतकरी संपादरम्यान रस्त्यावर घडणारा हिंसाचार नव्हे, तर ती शेतकऱ्यांच्या पोटातील भूकेची आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी एकजुटीचं अभेद्य दर्शन घडवलं आहे. शेतकऱ्यांची ही एकजुट संपूर्ण कर्जमाफी आणि हमीभाव दिल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत शिवसेनेने शेतकरी संपाला पाठिंबा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकरी संपाला संपूर्ण पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे. शेतकऱ्याच्या लढ्याची ही सुरुवात आहे. शेवटची मागणी मान्य होईपर्यंत शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी असेल, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पाचव्या दिवशी आंदोलन अधिक तीव्र करत महाराष्ट्र बंद ठेवला आहे. या महाराष्ट्र बंदला राज्यभरातून उत्स्फुर्त प्रतिसाद दिसून आला. शिवाय या बंदला अनेक राजकीय पक्षांनीही पाठिंबा दिला आहे. संपकरी शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत?