ठाणे घरगुती भांडण झाल्याने विवाहित महिला वैतागली होती. शांतता मिळावी म्हणून ही विवाहित तरूणी डायघरजवळील शीळ फाटा गणेश घोळ मंदिरात  गेली होती. येथे  मंदिर सांभाळण्यासाठी उत्तर प्रदेश येथून  (Thane Crime) आलेल्या तीन पुजाऱ्यांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करत तिचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ठाण्यात ही घटना घडली आहे.  


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  मंदिराचे मुख्य पुजारी बालक महाराज उत्तर प्रदेश येथे आपल्या गावी गेल्याने काही दिवस गणेश घोळ हे मंदिर सांभाळण्यासाठी श्यामसुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या तीन पुजाऱ्यांना गावाहून बोलावून घेतले होते. 6 जुलै रोजी बेलापूर येथे राहणारी तीस वर्षीय महिला घरगुती ताणतणाव कंटाळून सकाळी 10 वाजता गणेश घोळ मंदिरात शांती मिळवण्यासाठी गेली होती. दिवसभर ही महिला त्याच मंदिरात बसल्याने येथील पुजाऱ्यांनी तिला दुपारचे जेवण दिले. त्यानंतर संध्याकाळचा चहा देताना या चहामध्ये भांगेची गोळी मिसळून दिली  चहा प्यायलानंतर महिलेच शुद्ध हरपली. या दरम्यान या तीन नराधमांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. 


अत्याचार केल्यानंतर मृतदेह जंगलात फेकला


पहाटे शुद्ध आल्यानंतर या महिलेच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. मात्र आपले बिंग फुटेल हे पुजाऱ्यांना समजताच यांनी तिला मारहाण करत जमिनीवर आपटली आणि तिचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह मंदिराच्या बाजूला असलेल्या जंगलात फेकून दिला. दोन दिवसांनी मंदिरात गेलेल्या एका भक्ताला डोंगरावर जंगलात पडलेला तिचा मृतदेह दिसला. यासंदर्भात त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर तत्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले.


तीन आरोपींना ताब्यात


 सीसीटीव्ही तपासल्यानंतर पोलिसांना पुजाऱ्याचा संशय आला. पुजाऱ्यांना विचारपूस केली असता त्यांनी या घटनेची कबुली देत आमच्याबरोबर आणखीन एक आरोपी असल्याचे सांगितले. मात्र  पोलीस स्थानकात जाताक्षणी आरोपीने मुंबई येथे पळ काढल्याची माहिती देखील इतर दोन पुजारांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी आपली सूत्रे हलवत शर्मा याला चिता कॅम्प ट्रॉम्बे येथून अटक केली. दरम्यान श्यामसुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा, राजकुमार पांडे या तीन आरोपींना ताब्यात घेतले.अधिक तपास डायघर पोलीस करत आहेत.


हे ही वाचा :


पगार वाढवतो असं सांगत तरुणीकडे शरीरसुखाची मागणी, जीवन प्राधिकरण कार्यालयातील दोन अभियंत्यांवर विनयभंगाचा गुन्हा