Maharashtra Thane News Updates : ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा संवेदनशीलपणा आपण यापूर्वीही अनेक घटनांमध्ये पाहिला आहे. आता याच संवेदनशीलतेचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. मुख्यमंत्री शिंदे गडचिरोली (Gadchiroli News) येथील नियोजित दौरा आटोपून ठाण्यातील (Thane News) निवासस्थानी परतत होते. पण वाटेतच मुख्यमंत्र्यांना एक रुग्णवाहिका रस्त्यातच बंद पडलेल्या अवस्थेत दिसली. चुनाभट्टी - कुर्ला येथील पुलावर ही रुग्णवाहिका बंद पडलेली. मुख्यमंत्र्यांना तातडीनं ताफा थांबवला आणि स्वतः चौकशी केली. 


रुग्णवाहिकेत रुग्ण असून त्याला तातडीनं उपचारासाठी नाशिकहून मुंबईला आणण्यात आल्याची माहिती मिळाली. रुग्णाचं नाव धर्मा सोनवणे, पण मुंबईतील रुग्णालयात त्यांना दाखल करुन घेण्यास नकार देण्यात आला असल्यामुळे रुग्णाला पुन्हा नाशिकला नेलं जात असल्याचं नातेवाईकांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं.  


पाहा व्हिडीओ : Eknath Shinde Helps Ambulance : हायवेवर दिसली बंद पडलेली रुग्णवाहिका; एकनाथ शिंदेंची थांबवला ताफा



मुख्यमंत्र्यांनी क्षणाचाही विलंब न लावता, ठाणे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. कैलास पवार यांना फोन लावला. रुग्णाची माहिती देत, तात्काळ रुग्णाला दाखल करुन त्याच्यावर उपचार सुरू करण्यास सांगितलं. धर्मा सोनावणे यांचा अपघात झाला होता, त्यातच त्यांना हृदय विकाराचा सौम्य झटकाही आला होता. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या प्रमुखांच्या मदतीनं सर्वोतोपरी मदत पुरवण्यात आली आणि तात्काळ उपचार सुरू करण्यात आले. एवढंच नाहीतर, धर्मा सोनावणे यांच्या उपचाराचा सर्व खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून केला जाईल, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी ताफा थांबवून आपली अडचण समजून घेऊन तत्परतेनं मदत केलेली पाहुन धर्मा सोनवणे आणि त्यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. 


दरम्यान, गडचिरोलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शनिवारी (8 जुलै) रोजी गडचिरोलीतील पहिल्याच जाहीर कर्यक्रमात  सरकारमध्ये सर्व अलबेल असल्याचं सांगितलं आहे. तसेच तिघांची एकत्रित शक्ती भविष्यात राजकीय विजयाची नांदी ठरणार असल्याचं देखील यावेळी त्यांनी म्हटलं आहे. या कार्यक्रमात गडचिरोलीतील ग्रामीण जनतेने मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं. सत्तेमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच या तिघांनी एका जाहीर कार्यक्रमात एकत्रित हजेरी लावली. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Maharashtra Election Survey: महाराष्ट्रात आजच लोकसभा निवडणुका झाल्या, तर कोण मारणार बाजी? सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष