ठाणे : शहापूर नगर (Shahapur Nagar)  पंचायत हद्दीत  राज्य सरकारच्या 30 लाखांच्या  निधीतून कमान उभारण्यात आली आहे. मात्र स्थानिक भाजप नगरसेवकाने मनमानी करभार करीत त्याला स्वतःचे नाव दिल्याचा आरोप शिंदे गट (Shinde)  शिवसेनेच्या (Shivsena) मागासर्गीय विभागाच्या जिल्हा प्रमुख यांनी करत आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. तर भाजपच्या नगरसेवकाने जिल्हा प्रमुखाचे आरोप फेटाळत उपोषणच बेकायदा असल्याचे सांगितल्याने कमानीच्या नामकरणाचा वाद  आणखी पेटणार असल्याचे दिसून येत  आहे. 


ठाणे जिल्ह्यातील शहापूर नगर पंचायत समितीत (शिवसेना) शिंदे गटाची सत्ता आहे. तर राज्यात भाजप शिंदे सरकार सत्तेत आहे.  मात्र  ठाणे जिल्ह्यात विविध शहरासह ग्रामीण भागातील  दोन्ही गटाच्या नेत्यामध्ये अनेकदा राजकीय वादासह श्रेयवादाची लढाई सुरु असतानाच,  शहापूर नगर पंचायत समितीमधील प्रभाग क्र. 7 चे भाजपचे नगरसेवक हरेश पष्टे आणि शिंदे गट शिवसेनेच्या  मागासर्गीय विभागाच्या जिल्हा प्रमख ज्योती गायकवाड यांच्यामध्ये 30 लाखांचा राज्य सरकराचा निधी खर्च करून उभारलेल्या कमानीच्या नामकरणावरून वाद निर्माण झाला.


विशेष म्हणजे या कमानीला कोणाचे नाव देण्यात यावे असा  ठराव   नगसेवकांच्या बैठकीत अद्यापही मंजूर करण्यात आली नाही. मात्र दोन दिवसापूर्वीच केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते कमानीचे लोकार्पण सोहळा पार पडला. मात्र त्यापूर्वीच या कमानीला दिवंगत भगवान गायकवाड यांचे नाव देण्यासाठी 2021 साली जिल्हा प्रमख ज्योती गायकवाड नगरपंचायत प्रशासनाकडे लेखी पत्रव्यवहार करून मागणी केल्याचे सांगितले. तर नगरसेवक पष्टे यांनी राज्य सरकराच्या नगरविकास विभागाकडे  केलेल्या पाठपुराव्यामूळे निधी मंजूर करून कमान उभारल्याचे सांगितले. 


आरोप प्रत्यारोप 


दरम्यान  शिवसेना मागासर्गीय  जिल्हा प्रमख ज्योती गायकवाड यांनी कमानीच्या नामकरणाला विरोध केल्याने त्यांच्यावर नगरपंचायत प्रशासनाकडून त्यांनी लावलेले फलक काढून टाकल्याचे नगरसेवक पष्टे यांनी सांगितले. मात्र जिल्हा प्रमख ज्योती गायकवाड यांनी माझ्यावर कमानीच्या कामावर अडथळा निर्माण केल्याचा खोटा गुन्हा नगरसेवकाने दाखल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत नगरसेवक पष्टे गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण करत असल्याचे त्यांनी सांगितले.


नामकरणाचा वाद चिघळण्याची शक्यता


मात्र कायदेशीर प्रक्रियापूर्ण करून कमान उभारली असून येत्या नगरपंचायत मधील नगरसेवकांच्या बैठकीत कमानीला नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात येणार असल्याचे सांगत जर नामकरणाचा ठरावच झाला नाही यामुळे माझ्या विरोधातील उपोषण बेकायदेशीर असल्याचे सांगितले.  त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाच्या जिल्ह्यतील बड्या नेत्यांनी जर वाद मिटवला नाही तर नामकरणाचा वाद अधिक चिघळणार असल्याचे दिसून येत आहे.


हे ही वाचा :