मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवरुन पुन्हा एकदा भाजप आणि नरेंद्र मोदींवर प्रहार केला आहे.


ज्या सोशल मीडियाच्या जोरावर भाजप सरकार सत्तेत आलं, लोकांची मनं भडकवण्यासाठी खोट्याचं खरं करून दाखवलं, ट्रोलच्या माध्यमातून शिवीगाळ केली, तेच आता भाजपला बूमरँग होत आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

तसंच सोशल मीडियावर सरकारला विविध प्रश्नांवर जाब विचारणाऱ्यांना पोलीस नोटीस पाठवत आहेत. मात्र कोणालाही अशा नोटीस आल्या असतील, तर त्यांनी connectrajthackeray@gmail.com या मेल आयडीवर संपर्क साधा, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे.

राज ठाकरे यांची फेसबुक पोस्ट


संबंधित बातम्या

राज ठाकरे यांची पहिली फेसबुक पोस्ट


दाऊदला स्वतः भारतात यायचंय, मात्र मोदी श्रेय लाटणार : राज ठाकरे