Solapur :  रमजान ईद 31 मार्चला आहे की 1 एप्रिलला याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. अशा परिस्थितीत सोलापुरातील रुयते हिलाल कमिटीने (Ruyte Hilal Committee solapu) महत्वाची माहिती दिली आहे. देशभरात रमजान ईद उद्या साजरी होणार असल्याचे रुयते हिलाल कमिटीने सांगितले आहे. आज ईदचा चांद दिसल्याने उद्या रमजान ईद साजरी केली जाणार आहे. त्यामुळं 1 एप्रिलला ईद साजरी होणार असल्याचं बोललं जात होतं, मात्र 31 मार्चला रमजान ईद साजरी केली जाणार आहे.  

रमजानचा पवित्र महिना संपत असताना, जगभरातील मुस्लिमांची नजर आकाशाकडे लागलेली असते. रमजाननंतर, मुस्लिम समाजातील लोक त्यांच्या सर्वात मोठ्या सणाची, ईद-उल-फित्रची आतुरतेने वाट पाहत असतात. भारतात ईद कधी साजरी होईल हे चंद्रदर्शनावर अवलंबून असते. सहसा, सौदी अरेबियामध्ये चंद्र दिसल्याच्या एका दिवसानंतर भारतात ईद-उल-फित्र हा सण साजरा केला जातो. यावेळी ईद 31 मार्चला आहे की 1 एप्रिलला याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे.

31 मार्च रोजी भारतात ईद साजरी केली जाणार

रमजानच्या पवित्र महिन्यानंतर सौदी अरेबियामध्ये ईदचा चंद्र दिसला आहे. सौदी अरेबियाने याची अधिकृत घोषणा केली आहे. सौदी अरबमध्ये 30 मार्च (रविवार) रोजी येथे ईदची नमाज अदा करण्यात येणार असून हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे. सौदी अरेबियात चंद्रदर्शन झाल्यामुळे भारतात राहणाऱ्या मुस्लिमांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. वास्तविक, सौदी अरेबियानंतर एक दिवस म्हणजे 31 मार्च रोजी भारतात ईद साजरी केली जाईल.

भारतात ईदची तारीख कोण ठरवते?

सौदी अरेबियामध्ये रमजानचा महिना भारताच्या एक दिवस आधी सुरू होतो. यावेळी सौदी अरेबियामध्ये पहिला रोजा 1 मार्च रोजी साजरा करण्यात आला, तर भारतात 2 मार्चपासून रमजान सुरू झाला. त्यानुसार सौदीमध्ये एक दिवस आधी ईदही साजरी केली जात आहे. सौदी अरेबियामध्ये चंद्र दिसल्यानंतर भारतात ईदची तारीख जाहीर केली जाते. सौदी अरेबियामध्ये चंद्र दिसल्याच्या एका दिवसानंतर भारतात चंद्र दिसला, त्यानंतर भारतातील ईदची तारीख इमामांद्वारे जाहीर केली जाते.

रमजान संपल्यानंतर, दहावा महिना शव्वालच्या पहिल्या दिवशी ईद साजरी केली जाते. या दिवशी लोक एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देतात, ईदगाहवर नमाज अदा केली जाते आणि गोड पदार्थांसह विविध प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. 

महत्वाच्या बातम्या:

Eid : सौदीमध्ये चंद्र दिसला! 31 मार्च की 1 एप्रिल? भारतात ईद कधी साजरी होणार?