सातारा : भारतात आज होळी-धुळवड सणाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे, पण या होळीच्या सणावर ग्रहणाचे (Eclipse) सावटही आहे. त्यामुळे, अनेक ठिकाणी काही गोष्टी आणि रुढी पंरपरा पाळल्या जात आहेत. ग्रहणात काय करावे आणि काय करु नये, हे पूर्वजांनी, वयोवृद्धांनी किंवा जाणकारांनी सांगितल्याप्रमाणे प्रथा पाळल्या जातनाचे दिसून येते. अनेक मंदिरात दर्शनासाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. तर, काही महत्त्वाच्या आणि शुभ कामांनाही मनाई केली जाते. मात्र, अंधश्रद्धा (Superstition) निर्मूलन समितीने ग्रहणाती या प्रथा म्हणजे अंधश्रद्धा असल्याचं म्हटलं आहे. तसेच, अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कारवाईची मागणीही केली आहे. 

Continues below advertisement

चंद्रग्रहणासंबधी अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. आज बुधवार 3 मार्च रोजी या वर्षातले पहिले चंद्रग्रहण होत आहे. मात्र, ग्रहण ही एक खगोल शास्त्रीय घटना असून त्याचा मानवी जीवनावर कोणताही परिणाम होत नाही, असे अंनिसचे डॉ. हमीद दाभोळकर यांनी म्हटलं आहे. सोशल मिडियातून ग्रहणाविषयी अनेक अतिरंजित दावे केले जात आहेत. गर्भवती महिलांनी ग्रहण काळात एकाच जागेवर बसावे, पाणी पिऊ नये, तसेच मलमूत्र विसर्जन करू नये अशा स्वरूपाचे अवैज्ञानिक सल्ले दिले जात होते. त्या पार्श्वभूमीवर ग्रहणविषयी अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांवर शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी डॉ. हमीद दाभोळकर यांनी केली आहे. 

चंद्रग्रहणानिमित्त पुण्यातील दगडूशेठ मंदिर बंद

ग्रहण लागल्यानंतर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर बंद करण्यात आलय. साडे सहाच्या सुमारास ग्रहण संपल्यानंतर विधिपत पूजा करून दगडूशेठ मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात येणार आहे. आज दुपारी 3 वाजून 20 मिनिटे ते संध्याकाळी 6 वाजून 48 मिनिटांपर्यंत खग्रास चंद्रग्रहण असल्याने मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे.

Continues below advertisement

टीम इंडियाने सराव टाळला

टीम इंडिया पुढील सामन्यासाठी मुंबईत दाखल होताच आजच्या खग्रास चंद्रग्रहणाची माहिती भारतीय संघ व्यवस्थापनाला मिळाली. त्यानंतर टीम इंडियाच्या सरावाची वेळ संध्याकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत करण्यात आली आहे. प्रत्यक्षात भारतीय संघ आज संध्याकाळी 7 वाजल्यानंतर फ्लडलाईट्समध्ये सराव करताना दिसेल. तर, इंग्लंड संघाचा सराव पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार दुपारी सुरू झाला आहे. मात्र, खग्रास ग्रहणामुळे टीम इंडियाने आपला दुपारचा सराव टाळल्याची माहिती समोर आली आहे. 

हेही वाचा

Team India: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, टीम इंडियानं पाळला क्षण; सरावाची वेळ बदलली, चर्चा तर होणारच