पुणे: शहरालगतच्या  34 गावांपैकी केवळ दोन गावांचा पुणे महापालिकेमध्ये समावेश करण्यात येणार आहे.


राज्य सरकारने केवळ उरळी आणि फुरसुंगी देवाची या दोन गावांचा पुणे महापालिकेमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुण्या भोवतालच्या  34 गावांचा महापालिकेत समावेश करण्यात यावा, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर म्हणणं मांडताना राज्य सरकारने केवळ दोन गावांचा समेवश करण्याबद्दल अनुकूलता दर्शवली आहे.

तर नऊ गावांचा अंशतः समावेश केला जाईल असं राज्य सरकारने म्हटलं आहे. मात्र अंशतः म्हणजे काय याबाबत कोणतंही स्पष्टीकरण राज्य सरकारकडून देण्यात आलेलं नाही.

उरलेल्या 23 गावांचा समावेश पाण्याची उपलब्धता, रिंग रोड आणि इतर सुविधांचा विचार करुन पुढील तीन वर्षांमध्ये घेतला जाईल असं राज्य सरकारनी म्हटलं आहे. म्हणजे पुण्याभोवतालच्या 23 गावांना महापालिकेत येण्यासाठी आणखी तीन वर्षे वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.