शहराचं मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गणेशपेठेत तृतीयपंथीयांनी एकत्रित येऊन एक मठवजा घर बांधलं होतं. मात्र, गेली अनेक दशके या जुन्या घरात गरजेच्या अनेक सोईसुविधा अपुऱ्या पडू लागल्या. त्यातच परिवारातील व्यक्तींचा संख्याही वाढली.
सध्या या परिवारातील सदस्यांची संख्या 40 च्या वर आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून शासनाच्या अनुदानाशिवाय आपल्या घर वजा मठाचा कायापालट केला.
एका सूसज्ज इमारतीसह या मठात वाय-फाय इंटरनेटसह अनेक अत्याधुनिक सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
काल लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर तृतीयपंथीयांनी मठात गृहप्रवेश करुन लक्ष्मीपूजन केलं. यापुढे या मठात वृद्ध आणि वंचित तृतीयपंथीयांना आश्रय दिला जाणार आहे.