पुणे : राज्यातील वेगाने वाढणाऱ्या पुणे (Pune) शहरात भीषण अपघाताची (Accident) घटना घडली असून 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. शहरातील नवले पुलावर हा अपघात होऊन दोन ते तीन वाहनांनी पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत 20 जण जखमी झाल्याचे समजते, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अग्निशमन दलाच्या गाड्याही नवले ब्रीजवर पोहोचल्या आहेत. अपघातातील जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
शहरातील नवले ब्रीजवर सातत्याने अपघाताच्या घटना घडतात, आज पुन्हा एकदा येथे भीषण अपघाताची घटना घडली. 3 ते 4 गाड्यांची धडक बसल्याने हा अपघात झाला असून दोन कंटेनरच्यामध्ये एक कार जळत असल्याचं दिसून आलं. या कारमधून एक कुटुंब प्रवास करत होते, अशीही प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, अपघाताच्या घटनेनंतर अग्निशमन दल व पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर, काही काळासाठी नवले पुलासह रस्त्यावरची वाहतूक थांबवण्यात आली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असून सध्या मदत व बचाव कार्य सुरू आहे. नवले पुलावरील हा अपघात इतका भीषण होता की, गाड्यांची एकमेकांना धडक झाल्यानंतर दोन ते तीन वाहनांनी पेट घेतला. त्यामध्ये, 8 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी आहेत. सध्या पुणे आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आहे, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर काही काळासाठी रस्त्यावरची वाहतूकही थांबवण्यात आली आहे. अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे.
अपघात नेमका कसा घडला?
प्राथमिक माहितीनुसार, राजस्थान पासिंगचा लोडेड ट्रक साताऱ्याकडे मुंबईच्या दिशेने चालला होता. मात्र, नवले ब्रीजवरील सेल्फी पाँईटवर कदाचित त्याचा ब्रेक फेल झाला असावा, कारण त्याच्या ब्रेक फेलचे निशाण रस्त्यावर दिसून येत आहे. ब्रेक फेल झाल्याने ह्या ट्रकने इतरही वाहनांना धडक दिली, तसेच ट्रकने पुढे जाऊन कंटनेरला धडक दिली. मात्र, त्या कंटनेरच्या अलिकडे असलेली कार ट्रक आणि कंटेनरमध्ये अडकल्याची माहिती घटनास्थळावरुन पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या धडकेत कारने पेट घेतल्यानंतर ट्रकलाही आग लागली आहे. ब्रेक फेल झालेल्या ड्रायव्हरचाही मृत्यू झाल्याचे समजते, सध्या अडकलेले लोक आणि वाहनांना बाहेर काढणे हे आमचे प्राथमिक काम आहे, असेही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.
वसंत मोरेंनी व्यक्त केला संताप
या पुलावर रमलर लावून आणि कॅमेरे बसवून जमणार नाही, केवळ वाहतूक नियोजन करणे इतकंच काम नाही. तर, पोलीस असणे, सुरक्षा व्यवस्था आणि स्पीड संदर्भातील जे विषय आहेत ते सर्व केले पाहिजे. येथील संपूर्ण रस्ता हा उताराचा आहे, त्यादृष्टीनेही काम केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी नवले ब्रीजवरील अपघातानंतर दिली. नवले ब्रीजच्या अलिकडे काहीही वाहतूक कोंडी नसले, इथं बसवलेल्या कॅमेऱ्यात कैद वाहनांवर कारवाई होती की नाही, हाही प्रश्न आहे. एनएचयूआयचा हा भोंगळ कारभार आहे, केवळ अपघात झाल्यानंतर नेत्यांचा, आमदार, मंत्र्यांचा पाहणी दौरा होतो. अपघाताच्या विषयावर कुणीही अभ्यासक मार्ग सूचवत नाहीत, असेही मोरेंनी म्हटले. दरम्यान, माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनीही अपघाताव प्रतिक्रिया देत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा
अमोलदादा मला दत्तक घ्या, मी मिटकरी आडनाव लावायला तयार; लग्नाळू तरुणाचे आमदार मिटकरींनाही पत्र