‘पुण्यभूषण फाऊंडेशन च्या वतीने दिला जाणारा 29 वा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ डॉ. के. एच. संचेती यांना नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील होते. त्याचबरोबर पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, डॉ. रघुनाथ माशेलकर यांची उपस्थिती होती.
यावेळी नितीन गडकरी यांच्या हस्ते पुण्यभूषण पुरस्कार्थी डॉ. के.एच. संचिती यांना शाल ,पगडी आणि धनादेश देऊन गौरवण्यात आलं. याबरोबर 6 जेष्ठ स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव करण्यात आला.