पुणे: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपेक्षित रकमेची वसुली झाल्यानं, हा टोल तातडीनं बंद करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी केली  आहे. ते आज पुण्यात एबीपी माझाशी बोलत होते. माझाशी बोलताना ते म्हणाले की, ''पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर 2869 कोटी रुपये टोलवसुली होणं अपेक्षित होतं. त्यासाठी 2019 ची डेडलाईन आयआरबीला देण्यात आली होती. मात्र ही रक्कम 31 ऑक्टोबरलाच वसूल झाली आहे. त्यानंतरही पुढचे आठ दिवस आयआरबीनं बिनदिक्कत टोलवसुली केली. ज्यामुळं त्यांना अधिकच्या 7 कोटी रुपयांचा फायदा झाला. ज्याची माहिती कंत्राटदारानेच एमएसआरडीसीच्या वेबसाईटवर दिली आहे.'' त्यामुळं कंत्राटदाराला यापुढं टोलवसुलीची मुभा देणं लोकांच्या हक्कांवर आणि अधिकारांवर गदा आणण्यासारखं आहे. त्यामुळं हा टोल तातडीनं बंद करावा अशी मागणी जोर धरु लागली आहे. एक्सप्रेस-वे वरील एकूण टोल वसुली

वर्ष

अपेक्षित टोलवसुलीप्रत्यक्ष टोलवसुली
200497 कोटी रुपये28.5 कोटी रुपये
2005120 कोटी रुपये54.2 कोटी रुपये
2006101 कोटी रुपये61.20 कोटी रुपये
2007106 कोटी रुपये148 कोटी रुपये
2008132 कोटी रुपये187 कोटी रुपये
2009139 कोटी रुपये200 कोटी रुपये
2010145 कोटी रुपये214 कोटी रुपये
2011180 कोटी रुपये200 कोटी रुपये
2012189 कोटी रुपये275 कोटी रुपये
2013198 कोटी रुपये294 कोटी रुपये
2014246 कोटी रुपये360 कोटी रुपये
2015258 कोटी रुपये433 कोटी रुपये
2016271 कोटी रुपये413 कोटी रुपये
2017335 कोटी रुपये
2018352 कोटी रुपये
एकूण2869 कोटी रुपये

2867 कोटी रुपये