''ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या खेळाडूंवर बक्षीसांचा वर्षाव झाला. सगळेजण भेटायला येऊ लागले. परंतु हे आधी व्हायला हवं होतं. हा खर्च आधी व्हायला झाला तर अधिक चांगले खेळाडू तयार होतील,'' असेही ती यावेळी म्हणाली.
विशेष म्हणजे, तिने यावेळी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. ''जर मला योग्य प्रतिसाद मिळाला असता, तर मी अधिक भरीव कामगिरी करू शकली असती,'' असं ती यावेळी म्हणाली
याशिवाय रिओ ऑलिम्पिकमधील कामगिरीनंतर पी.व्ही. सिंधू आणि साक्षी मलिक यांची जात शोधण्याच्या प्रयत्नचा निषेध केला. हा प्रकार चुकीचा असून सर्वांचंच रक्त एक आहे. खेळाडूंची जात शोधण्यापेक्षा त्यांची कामगिरी बघा, असा टोलाही तिने यावेळी लगावला.